पालखी प्रस्थान हा भक्ती, समता, संस्कार आणि अध्यात्माचा महाराष्ट्रभर सुरू होणारा महायज्ञ आहे.
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
शतकानुशतके अखंड सुरू असलेल्या वारकरी परंपरेतील सर्वात पवित्र क्षणांपैकी एक असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यास आज उपस्थित राहण्याचा योग आला. श्री माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा हा मंगल सोहळा म्हणजे केवळ एका पालखीचा प्रवास नसून, भक्ती, समता, संस्कार आणि अध्यात्माचा महाराष्ट्रभर सुरू होणारा महायज्ञ आहे.
लाखो वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड गजराने आज श्रीक्षेत्र आळंदी भक्तिरसात न्हाऊन निघाले. या पवित्र सोहळ्यात सहभागी होत श्री माऊलींच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन केले.
यावेळी आमदार महेश दादा लांडगे, आळंदी येथील भारतीय जनता पक्षाचे नेते रामशेठ गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



