उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जावली तालुक्यातील मौजे आखेगणि ते बनवाडी या सुमारे २.५ किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण केवळ महिनाभरापूर्वी झालेले असूनही आज त्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे. संपूर्ण डांबर उखडले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सदरचा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत काम पूर्ववत करून गुणवत्ता पूर्ण रीतीने करावे, अशी स्पष्ट मागणी केली आहे. तसेच ठेकेदारास बिल देऊ नये आणि निकृष्ट कामासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. जर प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल," असा इशाराही संदीप पवार यांनी यावेळी दिला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा