शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या उन्नत व्हावे अशी मारोतराव कवळे गुरुजींची प्रबळ इच्छा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एका सर्वसाधारण कुटूंबातील युवक ते हजारों बेरोजगारांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणारा यशस्वी उद्योजक, सर्वसामान्यांच्या मनाला भिडलेला जनप्रिय नेता असा मारोतराव कवळे गुरुजींचा प्रवास सर्वांनाच अचंबित करणारा आहे. कुशल मॅनेजमेंट आणि उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर अल्पावधीतच गुरुजींनी गाठलेला दीर्घ पल्ला सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. आज मारोतराव कवळे गुरुजींच्या प्रेरणादायी प्रवास शब्दरूपाने आपल्यासमोर मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न.
कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सर्वसाधारण कुटूंबात गुरुजी लहानाचे मोठे झाले.घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. उमरी तालुक्यातील सिंधी हे गुरुजींचे जन्मगाव. जे विकासाची दृष्टी असणारा, सर्वसामान्यांच्या समस्यांविषयी खराखुरा कळवळा असणारा गुरुजींसारखा एक लोककल्याणकारी नेता आकाराला येतो आहे हे आमच्यासाठी आनंददायी आहे. गुरुजींप्रती मला आत्यांतिक आत्मीयता असण्याचे कदाचित हेही एक महत्वाचे कारण असावे. पूर्वंजाकडून मिळालेला राजकीय वारसा पुढे चालवत नेणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यासारखे आहे.त्यात अप्रूप वाटावे असे काही नाही.परंतू गुरुजींचा राजकीय प्रवास समजून घेतल्यानंतर एक बाब आपल्याला प्रकर्षाने लक्षात येईल ती म्हणजे गुरुजी हे काही आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांपैकी नाहीत.हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कारणीभूत ठरलेले उद्योगविश्व आणि स्वतः चे ठळक असे अस्तित्व गुरुजींनी स्वकर्तृत्वावर निर्माण केले आहे.मला गुरुजींचे अप्रूप वाटण्याचे हेही एक महत्वाचे कारण.आज नायगाव विधानसभा मतदारसंघात हेवा वाटावा एवढा मोठा उद्योगसमूह गुरुजींनी निर्माण केला आहे.गुरुजींची उद्योगविस्ताराची ही यशस्वी वाटचाल निश्चितपणे कौतुकास्पद आहे.गुरुजींकडे असणारी विद्वता,अप्रतिम व्यवस्थापन कौशल्य आणि त्यांचे उत्कृष्ट नियोजन या त्रिसूत्रीच्या बळावर गुरुजींनी हे सर्व शक्य करून दाखवले आहे.
प्रारंभीच्या काळात काही काळ गुरुजींनी शिक्षक म्हणूनही काम केले आहे. शिक्षकाचे आयुष्य तसे कम्फर्टेबल. परंतू सर्वसामान्यांच्या समस्यांविषयी अंतरिक तळमळ असणारे गुरुजी शिक्षक नावाच्या प्रोफेशनमध्ये समाधानी नव्हते. शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या उन्नत व्हावे अशी प्रबळ इच्छा हेच गुरुजींनी राजकारणात पदार्पण करण्याचे मुख्य कारण आहे. व्हीपीके उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुरुजी सातत्याने प्रयत्नशील आहेत.नायगाव विधानसभा मतदार संघातील हजारो बेरोजगार तरुणांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान उंचावण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत सर्वसामान्यांचा विश्वास गुरुजींनी संपादित केला आहे.म्हत्वाचे म्हणजे गुरुजींनी सर्वसामान्यांचं जगणं प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे.शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी,व्यथा गुरुजींनी अगदी जवळून पाहिल्या आहेत.
म्हणूनच सर्वसामान्यांचं जगणं प्रत्यक्ष अनुभवलेला, शेती आणि मातीशी घट्ट नातं जपणारा गुरुजींसारखा लोकाभिमुख नेता महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेला पाहिजे असे नायगाव मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांना मनापासून वाटते आहे. गुरुजींचा खणखणीत आणि अभ्यासू आवाज विधानसभेत घूमला पाहिजे असे आता काही मतदार बोलून दाखवत आहेत.समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी गुरुजी प्रामाणिकपणे आणि अविरतपणे प्रयत्नशील आहेत.कोणताही भेदभाव न करता सर्वांचे जगणे समृध्द व्हावे अशी त्यांची सर्वसमावेशक दृष्टी आहे. गुरुजींचे राजकीय भविष्य निश्चितपणे उज्वल असणार आहे याबाबत कोणाच्या मनात काही दुमत असण्याचे काही कारण नाही. माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणास्रोत असणारे मारोतराव कवळे गुरुजी आमदार झालेले पाहावयाचे आहेत. गुरुजींच्या सर्व हितचिंतकांचे हे स्वप्न 2024 मध्ये पूर्णत्वास जावो ही ईश्वरचरणी मनस्वी प्रार्थना.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा