कारवाईसाठी पथक निर्मितीची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत 19 ग्रामपंचायत मध्ये शंभर टक्के हागणदारी मुक्त गाव म्हणून घोषित करून गावात फलक ही लावण्यात आले. स्वच्छालय पूर्ण करूनही अनुदान घेऊनही काही नागरिक व महिला पुरुष रस्त्यावर जात असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य होत आहे. दुर्गंधी पसरली प्रकार घडत आहे. बारा हजार रुपये अनुदान घेऊनही हा सदर प्रकार घडत असल्याने परिसरात गंभीर बाब उघडकीस आली आहे. रस्त्याच्या कडेला उघड्यावर स्वच्छ असणाऱ्या कारवाई होत नाही तोपर्यंत हा प्रकार सुरूच राहणार आहे.
ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी 90% पेक्षाही अधिक लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले तरीही गाव खेड्यातील 50 ते 60 टक्के लोक उघड्यावर शौचालयस जातात त्यामुळे वातावरण दूषित होऊन अनेक आजारांना निमंत्रण दिले आहे. व गावातील सर्वच लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शेकडो वर्षाची परंपरा थांबायला तयार नाही ज्याने अनुदान घेतले ते उघड्यावर जात असल्याने त्यांच्याकडून ही रक्कम परत घ्यावी अशी मागणी होत आहे . शौचालयाचा वापर न करणाऱ्या कुटुंबांना योजनाचा लाभ दे ण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती . मात्र ग्रामपंचायत मार्फत कोणतेही पावले उचलले जात नसल्याने अनुदान देऊनही स्वच्छालय याच्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे . गाव परिसरात स्वच्छ ठेवायला हवा त्यासाठी अनेक योजना ची अंमलबजावणी ही केली पाहिजे ग्रामीण भागात येणाऱ्या वाहनांना प्रवेश करताना रस्त्यामध्ये केलेल्या घाणीमुळे नागरिकांसह विद्यार्थी.
अशा विविध सूचनाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गाव परिसर स्वच्छ ठेवायला योजनाची अंमलबजावणी ही ग्रामीण भागात झालेली दिसत नाही लोकांमध्ये पोहोचण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांचाकडून जनजागृती राबवण्याची गरज ग्रामीण भागामध्ये आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा