तीर्थक्षेत्राचे महत्त्व व पुरातील काळातील मंदिर परिसराची पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील 20 गावातील सीआरपी अर्थात समूह संसाधन व्यक्ती यांनी तालुक्याच्या वैभव असलेले लक्ष्मी नरसी मंदिर व श्री चक्रधर स्वामी यांचे समाधी स्थळ गोदावरी नदीकाठच्या तीरावर असलेले राहेर येथे तीर्थक्षेत्राला महिलांनी भेट दिली येथील तीर्थक्षेत्राचे महत्त्व व पुरातील काळातील मंदिर परिसराची पाहणी करून सदर गटातील महिलांनी या पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर भेट देऊन पर्यटनाची माहिती घेतली .
यावेळी लक्ष्मी नरसिंह मंदिर राहेर येथील पुरातन काळाच मंदिर असून त्या मंदिराचे वैशिष्ट्ये वैभव त्याचबरोबर श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर परिसराची माहिती त्याचबरोबर येथील पुजारी त्यांच्या सर्व माहिती घेऊन परिसराला भेट दिली . यावेळी समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर, वंदना राशक्षमारे मांडणी, सोनुताई कदम सोमठाणा, अर्चना पोतलवार कोलंबी, ज्योती पोतलवार, दरेगाव, वनिता कांबळे मुगाव, या महिला उपस्थित होत्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा