बाजारपेठ पूर्ण बंद करण्यास भाजप व्यापारीआघाडीचा विरोध
सोलापूर - ( प्रतिनिधी ) मागील संपूर्ण वर्षाच्या कोरोना महामारी च्या काळानंतर बाजारपेठा काही प्रमाणात सुरू होत असताना आता परत दुकाने पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयाला भाजप व्यापारी आघाडीने विरोध केला आहे. याबाबत व्यापारी आघाडीने पत्रक काढून या शासन निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जयंत होले- पाटील म्हणाले , कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे. मात्र बाजारपेठा बंद ठेवणे हा त्यावरील उपाय नाही. या महिन्यापासून विवाहाचे अनेक मुहूर्त आहेत. बाजारपेठ बंद राहिली तर नागरिकांनी खरेदी कशी करावी शिवाय दुकानांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या रोजीरोटीचाहि प्रश्न या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच बॅंकांचे हप्ते , महानगरपालिका कर , महावितरणची बिले शासनाकडे जमा केली आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशातच दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही.
ज्या शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे अधिक असतात अशी कार्यालय बंद ठेवण्यात आली आहे त. ज्या कार्यालयात नागरिकांची कामे कमी असतात ती कार्यालय सुरू ठेवण्यात आली आहे त. यापेक्षा काही तास का होईना नागरिकांसाठी आवश्यक कार्यालय सुरू ठेवणे गरजेचे आहे. असेही होले -पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास दायमा म्हणाले , सरसकट बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. बाजारपेठा सुरू राहील यात तरच समाजाचे अर्थचक्र सुरू राहणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शनिवारी , रविवारी काही नियम घालून बाजारपेठा काही प्रमाणात सुरू ठेवल्या किंवा बंद ठेवल्या तरी किमान सोमवार ते शुक्रवार या दरम्यान तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. दंड वसुलीत ही अनेकदा होणारा अतिरेकही थांबवावा. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा , अशी मागणीही भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनिवास यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड उपासमारीची वेळ
मुख्यमंत्र्यांनी भाषणात नमूद केलेले मुद्दे आणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशातील तरतुदी यामध्ये मोठी तफावत आहे. या आदेशामुळे 25 दिवस व्यापार बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचे चेंबर कॉमर्सने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा