maharashtra day, workers day, shivshahi news,

आठवडा बाजार बंद केल्याने शेतकरी संकटात

आठवडा बाजार बंद केल्याने शेतकरी संकटात

farmers in trouble , lockdown, akkalkot, solapur, shivshahi news


अक्कलकोट - (प्रतिनिधी ) अक्कलकोट मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातही लाॅकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे आठवडा बाजार बंद करण्याचे निर्देश दिल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटो, वांगी, कोबी या पिकांवर नांगर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. लाखो लोकांची उपजीविका ही आठवडी बाजारातून होत असते. आठवडी बाजारात बंद झाल्याने भाजीपाला विकायचा कुठे ? असा प्रश्न पडला आहे. आठवडा बाजार बंद केल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मालाची विक्री कुठे करायची , ही चिंता भेडसावत आहे.
कोरोनाच्या संकटात शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला असताना तरीदेखील शेतकरी आपल्या मालाची किंमत कवडीमोल रुपये विक्री होत असताना त्यात आठवडा बाजार बंद केल्याने शेतकरी वर्गास आणखीन संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सण-उत्सव समारंभावर निर्बंध लादण्यात आले आहे त. विवाह सोहळा जवळपास ठप्प झाल्याने त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उपासमार टाळणे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने नियम घालून आठवडा बाजार चालू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !