अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस ( प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत माळशिरस तालुक्यातील कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आपोहोचली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाला वेग आला आहे. सध्यास्थितीत प्रसिद्ध दुसऱ्या यादीखेर तालुक्यातील १०६ गावांतील २,३४८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती सहायक निबंधक पुष्पक सारडा यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेशी संलग्न ८३ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील ७२६ सभासद शेतकऱ्यांचा, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे. लाभार्थी यादीत प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या नावासमोर विशिष्ट क्रमांक व थकीत कर्जाची रक्कम नमूद केली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी आणि सूचना:
शेतकऱ्यांनी आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खाते यांचे पासबुक, लाभार्थी यादीतील नावासमोरील विशिष्ट क्रमांक, तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.
कर्जमाफी पात्र लाभार्थी यादी संबंधित ग्रामपंचायती, बँक शाखा, गटसचिव व सहायक निबंधक कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक असून, त्यासाठी माळशिरस तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांवर पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























