मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळली; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

बोगद्याला हानी नाही; रस्ता वाहतुकीबाबत अंतिम निर्णय तांत्रिक पाहणी आणि सुरक्षा मूल्यमापनानंतरच

A landslide occurred, Mumbai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, (मुंबई प्रतिनिधी)

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत ‘एमएसआरडीसी’चे (MSRDC) वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसामुळे डोंगरावरील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अचानक बदल झाला. परिणामी, मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली आली. सुदैवाने, या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या मुख्य बोगद्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहचलेली नाही. मात्र, एंट्री पॉईंटच्या परिसरातील शोसाठी (सौंदर्यीकरणासाठी) बांधण्यात आलेल्या स्लॅबचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे."

तज्ज्ञांमार्फत होणार तांत्रिक पाहणी

सध्या घटनास्थळी आणि डोंगराच्या माथ्यावर सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच दाट धुक्यामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे अचूक निरीक्षण करण्यात अडथळे येत आहेत. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांच्या समितीकडून या संपूर्ण परिसराची सविस्तर तांत्रिक पाहणी केली जाईल. पाण्याच्या प्रवाहात नेमका कशामुळे बदल झाला, याचा शोध घेऊन भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील, याचा निर्णय या पाहणीनंतरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर

दुर्घटना घडल्यापासून रस्त्यावर पडलेला स्लॅब, दगड आणि इतर मलबा हटविण्याचे काम प्रशासनातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

हा रस्ता वाहतुकीसाठी कधी खुला करायचा, याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त पाहणी व सुरक्षा मूल्यमापनानंतर (Safety Assessment) घेतला जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्यानंतरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी ग्वाही मंत्री भोसले यांनी दिली.


-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !