नागरिकांनी ध्वजारोहण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
भारताचा 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. तरी नागरिकांनी ध्वजारोहण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा व इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. तथापि, इतर शासकीय कार्यालयात अथवा संस्थेचा त्या दिवशी ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्या दिवशी सकाळी 8.35 वा. पूर्वी किंवा 9.35 वा. नंतर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा