साडेसहा लाखांचा एवज लंपास
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
परेल (मुंबई) ते कोल्हापूरला जाणा-या एसटीबसमधील प्रवासी महिलेच्या सोन्याच्या दागिण्यावर शिरवळ येथे बसलेल्या अज्ञात चार ते पाच चोरट्या महिलांनी नाण्यांची चिल्लर खाली टाकून डल्ला मारला. याबाबत साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार जुबेरा आब्बास रमदूल रा. साखरप्पा ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 19 जून रोजी फिर्यादी महिला या अपल्या कुटूंबिया बरोबर परेल मुंबई येथून कोल्हापूरला निघालेली होती एसटी. क्रं एम एच 14 एमएच 0354 या बसमध्ये प्रवास करीत होत्या. स्वारगेट येथून बस पुढे निघाली असता शिरवळ मध्ये त्या बस मधील प्रवाशी उतरले त्यामध्ये पाच महिला व तीन लहान मुले एसटीबसमध्ये बसली होती. त्या व्यक्तीना बसण्यास सीट नसल्याने त्यातील महिला जुबेरा यांच्या सीट जवळ उभी राहिली होती. त्यावेळी त्यांच्याकडील असलेली नाण्यांची चिल्लर खाली पाडली व खाली पडलेली चिल्लर गोळा करण्याच्या नादात जुबेरा रमदूल यांनी त्यांच्या कापडी पिशवीत ठेवलेल्या सोन्याचा दागिण्याचा डबा पिशवीसहीत गायब केला.
खंबाटकी घाट उतरल्यानंतर एसटी बस एका हॉटेलवर जेवणासाठी थांबली असता जुबेरा यांनी आपले एसटी मध्ये ठेवलेले साहित्य व्यवस्थित आहे का याची खात्री केली असता एसटी मध्ये दागिण्यांचा डबा असलेली पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले, त्या महिलेने ही बाब एसटी बसचे चालक व वाहक यांच्या लक्षात आणून दिली. त्यानी लगेच बस भुईज पोलिस ठाण्यात आणून बसची तपासणी केली असता काही मिळून आले नाही. शिरवळ येथे बसलेल्या महिलांनी ती दागिण्यांची पिशवी लंपास केली असल्याचा संशय आहे. त्या अज्ञात पाच महिलांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार माने करीत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा