अनेक पुलांवर सुरक्षा कठडे नसल्यामुळे गंभीर अपघातांची मालिका सुरूच

तीन ते चार नागरिकांनी गमावला आपला जीव

Dangerous broken bridges, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पुलाचे कठडे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कारण लोकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात असून संबंधीत जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. पुलावरील कठडे अभावी अपघात झाल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे व तात्काळ पुलाच्या कठडे दुरुस्त करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे

वाईच्या पश्चिम भागातील अनेक पुलांवर सुरक्षा कठडे नसल्यामुळे गंभीर अपघातांची मालिका सुरूच आहे, यामुळे आतापर्यंत तीन ते चार नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. काल एकसर गावातील युवक विशाल कळंबे याचा अशाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभागची दुर्लक्ष वृत्ती कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पश्चिम भागातील अनेक पुलांचे कठडे पूर्णपणे तुटलेले आहेत, तर काही पुलांवर कठडे असलेच तर ते अत्यंत कमजोर अवस्थेत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कारवाई करत नाही, ही गंभीर बाब नागरिकांच्या निदर्शनास आली आहे. काही ठिकाणी वेडी वाकडी वळणे असल्याचं फलक सुद्धा नाहीत तीव्र उतार असल्याचे फलक सुद्धा नाहीत.

विशाल कळंबे यांच्या अपघातापूर्वी देखील जवळजवळ त्याच ठिकाणी तीन ते चार व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही विभागाच्या निष्काळजीपणामुळे अजूनही त्या पुलाची दुरुस्ती किंवा कठडे बसवण्याचे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही.

या निष्क्रियतेमुळे संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र शब्दांत टीका केली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपघातांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात,

अन्यथा शिवसेना पक्षाकडून व पश्चिम भागातील नागरिक आंदोलन करणार असल्याचा  इशारा विशाल कळंबे यांच्या अंत्यविधी वेळी उपस्थित असताना शिवसेना विधानसभा प्रमुख विकास शिंदे यांनी  दिला आहे अनेक ठिकाणी कठाडे तुटलेले आहेत व काही ठिकाणी तर कठाडेच नाहीत अशी परिस्थिती झाली आहे या सर्व बाबी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या कानावर घालणार आसल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !