तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत ठरला पहिलाच संघ
शिवशाही वृत्तसेवा, (क्रीडा प्रतिनिधी दिपक चंदनशिवे)
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी (ICC champions trophy) मध्ये भारताने चार विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (new Zealand )यांच्या दरम्यान खेळला गेलेल्या अंतिम सामन्याची (finale) उत्सुकता कमालीचे ताणली गेली होती. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर (Dubai international stadium) रंगलेल्या या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने आपल्या शानदार खेळाचे प्रदर्शन करत 251 धावा केल्या.
समोर 252 धावांचे लक्ष घेऊन भारत मैदानात उतरला. सलामीला खेळणाऱ्या कप्तान रोहित शर्माने (Rohit Sharma) आक्रमक फलंदाजी करून ८३चेंडू मध्ये ७६ धावा फटकावल्या. त्यात (Shreya ayyar) श्रेयस अय्यरने ६२ चेंडू मध्ये ४८ धावांची भर घातली तर के एल राहुलच्या (k.L. rahul) ३३ चेंडूवर ३४ धावांमुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपला. हार्दिक पांड्याने (hardik Pandya) थोड्या वेळासाठी येऊन धाव गती वाढवली आणि भारताला जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता असताना जडेजाने (Ravindra Jadeja) चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
या महत्त्वाच्या सामन्यात शुभमन गील (shubhman gil) आणि विराट कोहली (Virat Kohli) विशेष कामगिरी करू शकले नसले सरी भारताच्या सांघिक प्रयत्न मुळे या सामन्यात ४ गडी राखून दणदणीत विजय (India won by 6 wickets) मिळवून तब्बल १२ वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वर भारताचे नाव कोरले आहे. यामुळे तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी भारत ही पहिली टीम ठरली आहे
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा