सुपा एमआयडीसीतील गणराज इस्पात या कंपनीच्या घातक धुरामूळे अपघाताचे प्रमाण वाढले
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
प्रशासनाला इथून मागे वारंवार निवेदन देऊन देखील व एमआयडीसी ऑफिसला पण अर्ज देऊन देखील या कंपनीवरती कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. या अगोदर नाशिक प्रदूषण विभागाची गाडी एमआयडीसी परिसरात आली होती.पण ती गाडी आली आणि पण त्यावेळेस पूर्ण एमआयडीसी ने धूर हा बंद ठेवला होता. कामाची मोठी भट्टी बंद ठेवली होती.आणि आणि ते कंपनी समोर आले सांगून आले त्या कंपनीवर धाड मारली पाहिजे. जेव्हा ती गाडी त्या कंपनी समोर आली त्या त्यावेळेस त्यांनी मोठी भट्टी बंद ठेवली होती. पूर्ण एमआयडीसीचे कामकाज हे बंद ठेवले होते. दोन दिवस जोपर्यंत ती गाडी त्या कंपनी समोर होती एमआयडीसीत होती तोपर्यंत कोणत्याही कंपनीने आणि त्या गणराज कंपनीने धूर सोडला नाही.
ही गणराज कंपनी नगर पुणे हायवे लगत आहे त्यामुळे शेजारी हॉटेल व शेती का आहे.ही कंपनी रात्री जास्त धुर सोडती त्यावेळी शाळा पेट्रोल पंप प्रवासी आणि अन्नधान्यावर खाद्यपदार्थावर खूप वाईट परिणाम होतो. आणि मनुष्याच्या प्रकृतीवर पण वाईट परिणाम होतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालावर खूप इतका वाईट परिणाम होतो की तिथले शेती माल पण येत नाही.
पंधरा दिवसात जर या कंपनीवर कारवाई केली नाही. याच्यावर जर प्रतिबंध घातला नाही तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसानंतर मुंबई प्रदूषण विभागाच्या ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे रासकर. यांनी सदर निवेदनात म्हटले आहे. तसेच या कंपनीसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा