प्रधानमंत्री सुरक्षा जीवन ज्योती योजना
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर एक येथे ग्राहक सेवा केंद्र बळीराम गणेश राव भंडार यांनी अनेक दिवसापासून बँकिंग सेवा देत आहेत त्यामध्ये नागरिकांना तालुकाचे ठिकाणी जाऊन पैसे टाकण्यासाठी व उचलण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने त्या ग्राहकांना त्रास कमी व्हावा या उद्देशाने बळीराम भंडारे यांनी ग्राहक सेवा केंद्र चालू करून नागरिकांना विविध योजनेचा लाभ देत त्यांनी नुकत्याच चालू असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा जीवन ज्योती योजना आपले एस.बी.आय. ग्राहक सेवा केंद्र अंतर्गत लोकांना योजनेचे माहिती देत खात्यांतर्गत लाभ मिळावा या उद्देशाने नागरिकांना आव्हान करत परिसरातील प्रत्येक नागरिकाचा विमा काढून घेणे चालू केले आहेत.
त्यामध्ये नुकतेच कुंटूर् येथील रहिवासी असलेली महिला रेणुका मारुती पुट्टेवाड यांनी काहीं वर्षापूर्वी 436 रुपये चा वार्षिक हप्ता चालू केलेला होता. त्यामध्ये त्यांचे काही दिवसापूर्वी अचानक निधन झाले आहे. तो निधनाची वार्ता एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला मिळतात त्यांनी त्यांच्या नावे असलेले 436 रुपयाचा विमा पावती घेऊन त्यांचे वारसा आनंद मारुती पुट्टेवाड यांना माहिती देऊन त्यांच्याकडे आईच्या नावे असलेली दस्तऐवज तपासून त्यांना दोन लाख रुपयाचा विमा मंजूर करून दिला आहे. त्यांना दोन लाख रुपयाचे धनादेश प्राप्त झाला असून त्यांच्या वारसाला स्टेट बँकेची शाखा व्यवस्थापक सुबोध कुमार यांनी रेणुकाबाई मारुती पुटेवाड यांचे वारस मुलगा होता त्यांना दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी तो धनादेश देऊन त्यांच्याकडे सुपूर्त केले आहे. व जनतेला 436 रुपयाचा विमा काढण्यास आव्हान करत.
त्यांच्या समवेत कुंटूर नगरीचे सरपंच मारुती कदम व भारतीय स्टेट बँकेची शाखा व्यवस्थापक सुबोध कुमार त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक बळीराम गणेशराव भंडारे व शिवदास कुऱ्हाडे यांची उपस्थिती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत यांना विमा मंजूर झाला नायगाव येथील भारतीय स्टेट बँके अंतर्गत जीवन ज्योती विमा मंजूर झाला. नायगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखा नायगाव येथील शाखा व्यवस्थापक सुबोध कुमार यांना वारसाला लाभ देऊन तत्परता दाखवली आहे. जनतेने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व अपघात विमा वय वर्षे 18 ते 50 वर्षापर्यंतच्या लोकांना आपल्या खात्यांतर्गत चालू करून त्यांचा लाभ मिळावा या उद्देशाने ग्राहक सेवा केंद्र संचालक बळीराम भंडारे यांनी लोकांकडून खात्यांतर्गत जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा योजना त्यांना लाभ घेण्यास सांगत आहेत. त्याचबरोबर जो व्यक्ती विमा लाभ घेत आहे त्यांचे मृत्यू पावल्यास किंवा अपघाती निधन झाल्यास मोठे आजार उद्भवल्यास त्या योजनेचा लाभ मिळू शकतो सध्या नायगाव तालुक्यातील अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा