मागासवर्गीयांचे घरे तोडल्यास आत्मदहन करणार

ईकळीमाळ दोन ग्रामपंचायत सदस्याचा इशारा 

Do not demolish houses of Dalit backward classes, ikalimal, naigaon , nanded, shivshahi News,

 शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )

    नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील वादग्रस्त गाव म्हणून ईकळीमाळ ह्या गावची ओळख सध्या होत आहे . शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमा मूल्य करून शासन निर्णय तर आहेच पण ईकळीमाळ ग्रामपंचायतने नाही घर असल्याचे नमुना नंबर आठही देण्यात आला . आणि त्या वस्तीला दलित वस्ती असे नाव हे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड बुक ला घेण्यात आले. सरपंच व ग्राम सेविका गावात जाती हे तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे . 

    अतिक्रम हटाव मोहीम दाखवून चुकीच्या निर्णयाला दोन ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला असून दलित वस्ती हटावची मोहीम बंद न केल्यास आत्मदहन करण्यात येईल असा इशारा गावातील दोन ग्रामपंचायतच्या सदस्यांनी दिला आहे.

     नायगाव तालुक्यातील मागच्या काही वर्षापासून शासकीय गायरान जमिनी आलेल्या अतिक्रमाचा वादाची ठिणगी पडली असून हाणामारी होऊन प्रकरणे ठाण्यावरून पोहोचले आहेत . प्रशासन कोणत्याही ठोस निर्णय घेत नाही. बघायचे भूमिका घेत असताना प्रशासनाच्या या बग्याच्या भूमिकेमुळे ग्रामपंचायतचे कारभारी दलित वस्ती हटाव म्हणून पुन्हा नव्याने वाद सुरू झाली आहे . या मोहिमेमुळे गावात तणावाचे वातावरण झाले असून जाती तेड निर्माण झाले आहे. दोन ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व ग्रामसेविका यांच्या कारभाराला कंटाळून गावातील आमचे घर हटवल्यास आत्मदहन करणारा असा इशारा जिल्हाअधिकारी नांदेड यांचा निवेदन दिले त्यांनी दिला आहे. दत्ता सूर्यवंशी व गंगाधर आनंदा सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले असून सरपंच व ग्रामसेविका विद्या मोरे यांनी अतिक्रमण धारकांना भोगवटा धारक म्हणून मान्यता देताना नमुना नंबर आठवरही नोंद घेण्यात आली आहे . 

तेथे वास्तव्यास असलेले नागरिक ग्रामपंचायतला करही भरतात मात्र शासकीय जागेवर मागासववरगिय यांच्या घरे असल्याने त्यांनी तिथून पळवण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये बेकायदेशी ठराव घेण्यात आला . या ठराव घेऊन सदर मागासवर्गीयांचे घरी काढून तिथे नवीन वस्ती व उच्च वस्ती बसवण्याचा घाट असल्याचेही या सदस्यांनी सांगितले . ईकळीमाळ येथील अन्य जागेवर अतिक्रम असतानाही मागासवर्गीयांचेच अतिक्रम हटवण्याची मोहीम का ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे . या प्रयत्नाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून सौ पद्मिनीताई दत्ता सूर्यवंशी व गंगाधर अनाथ सूर्यवंशी यांनी कडाडून विरोध केला होता गोरगरिबांचे घरी हटवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा आहे त्यांनी दिला आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !