विकासासाठी समाधान आवताडे यांना विजयी करा
आ . प्रशांत परिचारक ; रांझणी येथे प्रचार सभेत राज्य सरकारवर टीका
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) पंढरपूरची पोटनिवडणूक शेतकऱ्यांच्या आक्रोशाची आहे . 35 गावांना पाणी देतो म्हणून भूलथापा मारल्या . विकासकामाचे फक्त कागदी घोडे नाचवले. विठ्ठल कारखाना विक्रीस काढला. कामगारांना वाऱ्यावर सोडले. आत्ता वारसा सांगून मते मागत आहेत. पण मते मिळवण्यासाठी काम करावे लागते. विकासाला खीळ घालू नका. पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी समाधान आवताडे यांना विजयी करा , असे आव्हान आमदार प्रशांत परिचारक यांनी केले . रांझणी ( तालुका पंढरपूर ) येथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा प्रचार सभेत ते बोलत होते . ते म्हणाले , ही निवडणूक विचारांची आहे. विरोधक भारत भालके विरोधातील निवडणूक असल्याचा बनाव आणत आहेत. मात्र राज्यातील भ्रष्ट सरकार विरुद्ध सामान्य जनता , अशी निवडणूक आहे . राजकारणात मीही भावनेवर राजकारण केले असते ; मात्र मोठ्या मालकांनी सुरू केलेले कारखाने , संस्था या मोठ्या करायचा आहेत .
यावेळी बोलताना उमेदवार समाधान आवताडे म्हणाले की , मला मंगळवेढ्याने स्वीकारले आहे. मात्र आता पंढरपुरात स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ यामुळे हत्तीचे बळ आले आहे . ही निवडणूक विकासाची निवडणूक असून कोणत्याही संस्था बुडवायचा नाहीत . त्या कशा चांगल्या चालतील हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे , जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख , डॉक्टर बी .पी . रोंगे , दीपक भोसले , शशिकांत चव्हाण , वसंतराव देशमुख, प्रणव परिचारक , प्रशांत देशमुख , सूनील सर्वगोड , माऊली हळणवर , सुरेश आगावणे , बाळासाहेब देशमुख , दिलीप घाडगे , भास्कर कसगावडे , हरिभाऊ गावंदरे , सिताराम भुसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा