अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस
ग्रामपंचायत निवडणुकांचे आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर-(प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघारीचा महत्त्वाचा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. गावातील राजकाकारणाची दिशा ठरवण्यासाठी आवश्यक ती 'सेटलमेंट' करण्याची शेवटची संधी पॅनेल प्रमुखांना उरली आहे. अपक्ष आणि विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल यांची मनधरणी करण्यासाठी पॅनेल प्रमुखांची धडपड सुरू झाली आहे. कोणत्या पद्धतीने विरोधी उमेदवार आपल्या गळ्याला लागतील यासाठी चे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
इच्छुकांची नेत्यांकडून मनधरणी
ग्रामपंचायत निवडणुकीत आज सोमवार, ४ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. विरोधातिल उमेदवार कमी करण्याबरोबरच आपल्या बाजूने मतदार वळवण्यासाठी पॅनेल प्रमुखांना ही शेवटची संधी असते. या टप्प्यावर अनेक वेळा मोठमोठ्या 'सेटलमेंट' होतात. अनेकांना पुढील निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जाते. तसेच काही जणांना दुसऱ्या वार्डात मदत करण्याची तयारी ठेवली जाते. काहींना आमिष दाखवून निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रविवारी दिवसभर वरिष्ठ नेते मंडळी तसेच गावातील पॅनेल प्रमुखांनी बंडखोरी केलेल्या लोकांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीची मनधरणी सुरू केली.
आजच होणार चिन्हाचे वाटप - उद्यापासूनच प्रचाराचा धडाका
अर्ज माघारीची वेळ सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अंतीम उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यानंतर चार नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारपासून गावागावात प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. सुमारे दहा दिवस प्रचार रंगणार आहे.
उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा अधिकार
उमेदवारी माघार घ्यायची आहे त्याच उमेदवारांनी स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी या समोर अर्ज माघार घ्यावी लागणार आहे. निवडणूक प्रतिनिधी द्वारे अर्ज माघारी घेता येणार नसल्याचे उत्तर चे तहसीलदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा