congress & shivsena |
महाविकास आघाडी पुन्हा रंगला कलगीतुरा
मुंबई -( प्रतिनिधी ) औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना ढोंगी असल्याची थेट टीका करून , पाच वर्षे सत्तेत असताना औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा का आठवला नाही ? असा खरमरीत सवालच केला. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी औरंगाबादच्या विकासाबद्दल चर्चा करावी , गेल्या पाच वर्षात काय केले ? याचा हिशेब घ्यावा, असा हल्ला थोरात यांनी चढवला.
राऊत यांनी खुलासा करावाशिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आमच्यासाठी औरंगाबाद नाही , तर संभाजीनगरच राहणार, असे स्पष्ट केले. औरंगजेबाबद्दलचे प्रेम म्हणजे सेक्युलर असणे नव्हे , औरंगजेब कुणाला प्रिय असेल , तर त्यांना कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत ! असा टोला नामांतरालाविरोध करणाऱ्या काँग्रेसला त्यांनी लगावला. राऊत यांच्या ' रोखठोक ' या ' सामना ' मधील सदरातून टोलेबाजी झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलेच आक्रमक झाले. औरंगाबादच्या नामांतर आवरून थोरात यांनी शिवसेनेवर चांगलाच प्रश्नांचा भडीमार केला आहे.
संभाजीनगर पेक्षा विकास महत्वाचा आहे - कांग्रेस
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे , अशी मागणी शिवसेनेसह भाजपनेही केली असून , थोरात यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे दोन्ही पक्षांना चांगलेच सुनावले आहे. केंद्र आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगताना यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही ? असा सवाल करताना गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद मध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही औरंगाबादच्या विकासाच्या बाबतीत जनतेचा भ्रमनिरास केला असून , जनतेचे लक्ष त्यावरुन विचलित व्हावे , यासाठी नामांतराचा आधार घेतला जात असल्याची टीकाही थोरात यांनी केली आहे. मात्र , अशा मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेला आज नामांतराचा पेक्षा विकास महत्त्वाचा आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.
तर त्याला कडाडून विरोध करू - काँग्रेस
राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने मतांचा चिंतेनेच हा नामांतराचा 'सामना 'सुरु केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठे आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी करत आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू ,असा इशाराही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.
शिवसेना कात्रीत
थोरात यांच्यापाठोपाठ महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही शिवसेनेवर हल्ला केला आहे. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे. दरम्यान, नामांतरवरून यंदाची औरंगाबाद महापालिका निवडणूकही गाजण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भाजप कडून होत असलेली नामांतराची मागणी आणि सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसचा त्यास असलेला कडवा विरोध, अशा कात्रीत शिवसेना अडकली आहे .
हे वागणं 'सेक्युलर ' नव्हे !
आमच्यासाठी औरंगाबाद नाही , तर संभाजीनगरच आहे आणि संभाजी नगरच राहणार , असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असून , चर्चा झाली तरी निर्णय आधीच झालेला आहे. दरम्यान, राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवेत. औरंगजेब हा ' सेक्युलर ' वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्म धर्माधिष्ठित राज्यविस्तार करायचा होता. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्य विस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला.
संभाजी नगरच राहणार - संजय राऊत
जे मुसलमान नाहीत अशी काफिर लोकांना मारण्याकरिता जी हाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही, असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. त्याने शिवाजी राजांना शत्रू मानलेच; पण छत्रपती संभाजी ना हाल हाल करून मारले,असा औरंगजेब संभाजीराजांच्या बलीदानानंतर ही पंचवीस वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. आशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंग चे कुणाला प्रिय असेल , तर त्यांना कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत !
हा तर ढोंगीपणा - बाळासाहेब थोरात
कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे: औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुराळा उडवून काहीजण स्वार्थापोटी शिळ्या कढीला ऊत आणत आहेत.काँग्रेसने वारंवार आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही आम्हाला सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढते आहे; मात्र, गेल्या पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेल्यांनीच आज नामांतराचे राजकारण करावे, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे ?
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा