भीषण अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर - पाडळी दर्याच्या घाटात दोन ठिकाणी रस्ता वाहिल्याने वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे . भीषण अपघात होऊन मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घाटाखालील गावांना पठारावरील गावांना जोडणारा पाडळी दर्या चा हा घाट खूप महत्त्व पूर्ण असून या मार्गाने दररोज मोठी वाहतूक होत असते . या मार्गाने एस टी बस, खाजगी दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे चालकांना अतिशय खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा कोणत्याही क्षणी वाहन व त्यातील प्रवासी खाली दरीत कोसळू शकते . कित्येक वर्षे या घाटाची डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आलेली नसून सध्या पडणाऱ्या पावसाने या घाटातील दोन ठिकाणी डांबरी रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहे . पाडळी दर्या येथील सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक गिताराम नारायण खोसे व इतरांनी वाहन धारक , चालकांच्या लक्षात येण्याकरिता या ठिकाणी संरक्षण दगड लावले आहेत , हा प्रकारे जणू वाहन चालकांना इशारा देण्याचाच प्रयत्न केला आहे , जेणे करून रस्त्याची परिस्थिती लक्षात येवून संभाव्य अपघात टळावा.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या पाडळी दर्या घाटाची त्वरीत संपूर्ण दुरुस्ती करून भविष्यातील संभाव्य व भीषण अपघात टाळावा व घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठडे , दिशा दर्शक फलक लावावेत , जेणेकरून भविष्यात होणारा , भीषण अपघात टळला जाईल , अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी केले आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा