maharashtra day, workers day, shivshahi news,

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनमुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायास चालना- विधानसभेचे सभापती रमेश तवडकर

दी प्राइड ऑफ इंडिया -भास्कर अवॉर्ड पुरस्कार प्रदान सोहळा

The Pride of India Bhaskar Award, Maharashtra Journalist Foundation, goa, satara, wai, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या उपक्रमांमुळे गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेत वाढ होत असते. दरवर्षी ही संस्था गोव्यात विविध कार्यक्रम राबवित असल्यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायास चालना मिळत आहे, असे गौरवोदगार गोवा विधानसभेचे सभापती ना. रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे गोव्याच्या दीनानाथ मंगेशकर सांस्कृतिक सभागृहात नुकताच राज्यभरातील विविध गुणवंतांचा दी प्राइड ऑफ इंडिया -भास्कर अवॉर्ड पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारतचे समूह संपादक डॉ. किरण ठाकूर होते. यावेळी माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, गोव्याचे पर्यटन मंत्री ना रोहन खवटे, दै. तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मामाजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत म्हणाले, चांगल्याला चांगले म्हणणारी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. अशा परिस्थितीत राज्यभरातील आणि विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गुणगौरव करण्याची परंपरा महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनने जपली आहे. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंतांचे संमेलनच दरवर्षी गोमंतक भूमीत आयोजित केले जाते, ही बाब कौतुकास्पद आहे.  राज्याच्या विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  मान्यवर गुणीजनांचा सलग दोन दशकांपासून सातत्याने गुणगौरव होत असल्याने पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह त्यांचे स्नेही जन व समाजातील विविध घटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

किरण ठाकूर यांनी गोव्यातील प्रत्येक आमदारांनी प्रत्येकी पाच खेडी दत्तक घ्यावीत व त्या खेड्यांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. गोव्यातील पोर्तुगीजांची राजवट उलटवून टाकण्यासाठी शिवरायांनी सर्वप्रथम गोव्यावर हल्ला केला. तेव्हापासून सुरू असलेला गोवा मुक्तीचा लढा खूप उशिरा यशस्वी झाला असला तरी महाराष्ट्र आणि गोव्याचे नाते खूप जिव्हाळ्याचे आहे गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राने दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. पत्रकारांच्या माध्यमांतून समाजाला योग्य दिशा देणारे नेते तयार झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.  रमाकांत खलप म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची दखल घेणार यांची संख्या कमी होत असताना आणि दिवसेंदिवस स्वार्थी वृत्ती बोकाळत असतानाही समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्यांना आणखी उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी होत असलेला दोन दशकांपासून सातत्याने होत असलेला सत्कार सोहळ्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भास्कर भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमाची माझा स्नेह आहे ज्या सूर्याचे नाव घेऊन हा उपक्रम संपन्न होतो त्या सूर्याचेच तेज प्रत्येक पुरस्कार प्राप्त मान्यवराच्या कार्यात दिसून येते. दरवर्षी गोव्याच्या भूमीत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करणारे संयोजक राजीव लोहार  खऱ्या अर्थाने भास्कररुपी सूर्यदेवतेचे प्रतीक आहेत. स्वतःच्या तेजोवलयात इतरांनाही सामावून घेण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न स्तुत्य आहे.

वाईतील डाँ. महेश मेणबुदले, मांढरदेव येथील सामाजिक कार्यकर्ते व गरवारे कंपनीतील आदर्श कामगार शंकर मांढरे, पाचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलच्या संचालिका आदिती गोराडीया, प्राथमिक शिक्षिका सौ. संगीता मुके, रवींद्र कदम यांना तरूण भारतचे मुख्य संपादक पत्रकार किरण ठाकूर यांच्या हस्ते दी प्राईड आँफ इंडीया भास्कर अवार्ड देण्यात आले. वाईतील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर यांना मुंबईतील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दि. 6 जानेवारी, 2025 पत्रकारदिनी पिंपरी चिंचवड येथे गौरविण्यात आले. त्यानिमित्त मर्ढेकर यांचा रमाकांत खलप यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमात आदर्श धन्वंतरी डॉ. विवेक लोळगे, ठाणे व डॉ.जी.एम. सुतार, डॉ. प्रतीक्षा खलप, डॉ. पियू धनवडे, कोल्हापूर, डॉ. राजेश्वर विष्णुदास नाईक, डॉ. शुभांगी विजयसिंह देशमुख, , ह.भ.प. नंदकुमार शेटे, सौ. अर्चना संदीप माळी, वसंतशेठ कोठारी, बिपिन तलाठी, दिलीप अहिरे- माथेरान, अलका पाटील, पाचेगाव, सौ. सानिका सावंत, डॉ. समृद्धी स्वप्निल मेथा,डॉ. अश्विनी भोईटे, रवींद्र उत्तमराव कांबळे, अनिल सदानंद बामणे, दिलीप आकाराम चौगुले, सौ. अश्विनी अभिजीत गुरव, सौ. सुमन गजानन देसाई, कु. अपूर्वा प्रकाश हांडे -पाटील, डॉ. चंद्रकांत तुकाराम सावंत,  सदानंद भिकू सतरकर, विलास रामनाथ सातारकर आदिना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गोव्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारभी दीपप्रज्वलन व श्री शिवाजी महाराज प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. फौडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, महिला अध्यक्षा सौ मनिषा लोहार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक दगडु माने यांनी प्रास्ताविक केले, अॅड प्राजक्ता लोहार यांनी सूत्रसंचालन केले . फौंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांनी  आभार मानले. अपूर्व हांडे यांनी भरतनाट्य नृत्याचे सुरेख सादरीकरण केले. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !