maharashtra day, workers day, shivshahi news,

शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण

शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण

पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला ; ५ जखमी

farmers protest, delhi, naresh tikait, rakesh tikait, shivshahi news
दिल्लीत पोलिसांवर हल्ला

नवी दिल्ली - ( प्रतिनिधी ) शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी पुन्हा हिंसक वळण लागले. दुपारी एक वाजता नरेला, वाना गावाचे लोक धरणे आंदोलन स्थळी आले आणि शेतकऱ्यांना सीमा रिकामी करण्यास सांगू लागले. आंदोलनामुळे परिसरातील लोकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, असे या लोकांचे म्हणणे होते. पावणे दोन वाजता हे लोक शेतकऱ्यांच्या तंबू पर्यंत पोहोचले आणि तोडफोड केली. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. मध्यस्थीला आलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. अलीपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पालीवाल यांच्यावर तलवार हल्ला झाला.

  farmers protest, delhi, naresh tikait, rakesh tikait, shivshahi news  
naresh tikait

दरम्यान, जोवर तिन्ही कृषी कायदे संपूर्णपणे रद्द करण्यात येत    नाहीत, तोवर शेतकरी आंदोलक सिंघू सीमेवरून परत फिरणार नाहीत, असा इशारा टिटू च्या माध्यमातून भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलक तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये दगडफेक सुरू असताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सौम्य लाठीचार्ज तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !