मराठा आरक्षण सुनावणी चार आठवडे लांबणीवर
मराठा संघटनांकडून सरकारवर टीकेचे झोड
मराठा मोर्चा - संग्रहित चित्र |
![]() |
सर्वोच्य न्यायालय - संग्रहित चित्र |
राज्य सरकार गंभीर नाही .,चंद्रकांत पाटील यांचा आरोपसुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे . सरकार अजूनही मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही . असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला .
पुढील सुनावणी घटनापीठासमोर शक्य
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे . सरकार अजूनही मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही . असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला . तामिळनाडू सरकारने दिलेल्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे . तामिळनाडू सरकारने प्रथम आरक्षणावरील स्थगिती उठवून घेतली . त्यामुळे खंडपीठाचा निर्णय होईपर्यंत तेथील जनतेला राज्य सरकारच्या सवलती मिळणार आहे . महाराष्ट्र सरकारने याच भूमिकेतून स्थगिती उठवणे अपेक्षित होते ,असे ते म्हणाले . मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात भूमिका मांडायची यासंदर्भात युक्तिवाद करणारे वकील व राज्य शासन यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे मंगळवारी सर्वोच्य न्यायालयात सुनावणीवेळी झालेल्या प्रकारावरून दिसून आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .
![]() |
मराठा मोर्चा - संग्रहित चित्र |
आज महाराष्ट्रात मागास आयोगाचे अस्तित्वच नाही.
दि . ९ सप्टेंबरला सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली . त्यानंतर ४७ दिवसांनी प्रथमच मंगळवारी सुनावणी झाली . हि सुनावणी ज्या न्यायाधिशानी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली ,त्यांच्यासमोर झाली . त्यामुळे सुरुवातीला काय भूमिका घ्यायची या संभ्रमात असणारे राज्य सरकारचे वकीलच युक्तिवादासाठी आले नाहीत . काही वेळाने खंडपीठाने पुन्हा राज्य शासनाला बाजू मांडण्यास सांगितले . तेव्हा वकिलांनी मराठा आरक्षणाची पाच न्यायाधिशाच्या खंडपीठाकडे सुनावणी घ्यावी ,अशी मागणी केली .मंगळवारी झालेली सुनावणी हि मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत होती . यासाठी सरकारने पूर्ण ताकदीनिशी आपली बाजू मांडणे अपेक्षित होते , असेही पाटील म्हणाले. भाजपचे सरकार असताना ही सुनावणी १ वर्ष चालली . महाविकास आघाडीने हीच केस पुढे चालवली पाहिजे होती . पण तसे झाले नाही . मंगळवारी सुनावणीवेळी राज्याचे मंत्री दिल्लीत हजर पाहिजे होते . पण कोणीही गेले नाही , असेही पाटील यांनी सांगितले . सुनावणी होण्यापूर्वी राज्य शासन व वकिलाच्या पॅनलमध्ये चर्चा होणे अपेक्षित होते . ज्या मागास आयोगाच्या शिफारशींमुळे आरक्षणं मिळाले, त्यांच्याशी चर्चा केली जात नाही . आज महाराष्ट्रात मागास आयोगाचे अस्तित्वच नाही.
|