विठ्ठल सहकारीच्या चेअरमन पदी भगीरथ भालके बिनविरोध
![]() |
bhagirath bhalake |
![]() |
bhagirath bhalake |
आमदार भारत भालके यांच्या आकस्मित निधनानंतर रिक्त झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांची एकमताने निवड करण्यात आली सहाय्यक निबंधक तांदळे यांच्या उपस्थितीत आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये भगीरथ भालके यांची निवड करण्यात आली आमदार भारत भालके यांनी सलग अठरा वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा सांभाळली कारखान्याचे विस्तारीकरण त्यांनी केले परंतु गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे गेल्या वर्षी इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ कारखाना प्रशासनावर आली होती यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी आमदार भारत भालके यांनी कोरुना च्या काळात सुद्धा मुंबईत ठाण मांडून कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज मंजूर करून आणले होते आणि कारखाना सुरू केला होता परंतु दरम्यान आमदार भारत भालके यांचे अकस्मात निधन झाल्याने आता कारखान्याची जबाबदारी त्यांचे पुत्र भगीरथ दादा भालके यांच्यावर सोपवण्यात आली आहे नूतन चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत अडचणीत असलेला कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे पुढच्या महिन्यात साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे ही निवडणूक भगीरथ दादा भालके यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा